Sunday, January 15, 2012

"ऋण"

कविता प्रसिद्द कवी 'श्री.दि.इनामदार' यांची आहे

"ऋण"

तुझ्या शेतात राबुण
माझी सरली हयात
नको करू हेटाळणी
आता उतार वयात॥१॥

नाही राजा ओढवत
चार पाऊले नांगर
नको बोलूस वंगाळ
नको म्हणूस डंगर॥२॥

माझ्या ऐन उमेदीत
माझी गाईली ओवी
नको चाबकासारखी
आता फटकारू शिवी॥३॥

माझा घालवाया शीण
तेव्हा चारलास गुळ
कधी घातलीस झुल
कधी घातलीस माळ॥४॥

अशा गोड आठवणी
त्यांचे करीत रवंथ
मला मरण येऊ दे
तुझे कुशल चितींत॥५॥

मेल्यावर तुझे ठायी
पुन्हा एकदा रुजू दे
माझ्या कातड्याचे जोडे
तुझ्या पायात वाजू दे॥६॥

No comments:

Post a Comment